मराठी निबंध (Essay)

 1)  खेळांचे महत्त्व

खेळ आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहेत. खेळ खेळल्याने शरीर मजबूत आणि निरोगी राहते. खेळामुळे हात, पाय आणि डोळ्यांचा चांगला व्यायाम होतो.

खेळांमुळे शिस्त, वेळेचे महत्त्व आणि संघभावना शिकायला मिळते. खेळ खेळताना आपण हार आणि जीत स्वीकारायला शिकतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो.

खेळ मन ताजे ठेवतात. अभ्यासाचा ताण कमी होतो. खेळांमुळे मैत्री वाढते आणि आनंद मिळतो.

म्हणूनच रोज थोडा वेळ खेळासाठी दिला पाहिजे. खेळ हे आरोग्य आणि यशासाठी खूप आवश्यक आहेत.

===================================

2)  वेळेचे महत्त्व

वेळ ही देवाची अमूल्य देणगी आहे. वेळ एकदा निघून गेली की ती परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग केला पाहिजे. जो माणूस वेळेचे महत्त्व समजतो, तो जीवनात पुढे जातो.

विद्यार्थ्यांसाठी वेळ खूप महत्त्वाची असते. वेळेवर अभ्यास केल्याने धडे नीट समजतात आणि चांगले गुण मिळतात. वेळेवर शाळेत जाणे आणि गृहपाठ करणे ही चांगली सवय आहे.

वेळेचा अपव्यय केल्यास नुकसान होते. आळस, खेळ किंवा मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवल्याने वेळ वाया जातो. त्यामुळे काम अपूर्ण राहते.

जो माणूस वेळ पाळतो, तो शिस्तप्रिय बनतो. वेळेचे नियोजन केल्याने सर्व कामे व्यवस्थित होतात. आत्मविश्वास वाढतो.

म्हणूनच आपण वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे. वेळेचा सदुपयोग करून यशस्वी जीवन घडवले पाहिजे.

===================================

3)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान नेते होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ते खूप बुद्धिमान आणि मेहनती होते. त्यांनी खूप शिक्षण घेतले.

डॉ. आंबेडकर यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी गरीब, दलित आणि मागास वर्गासाठी काम केले. सर्वांना समान हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी देशाला मजबूत कायदे दिले. त्यामुळे भारत एक लोकशाही देश बनला.

    ते लोकसभेचे सदस्य आणि देशाचे पहिले कायदा मंत्री होते. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे महान व्यक्ती होते. आपण त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे.

===================================

4)  पु. ल. देशपांडे

पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक आणि विनोदी साहित्यिक होते. त्यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे होते. त्यांना सर्वजण प्रेमाने पु. ल.” म्हणत.

पु. ल. देशपांडे यांनी कथा, निबंध, प्रवासवर्णन आणि नाटके लिहिली. त्यांच्या लेखनात साधेपणा आणि विनोद होता. त्यामुळे लोकांना त्यांचे लेखन खूप आवडत होते. त्यांच्या लिखाणातून जीवनातील छोट्या गोष्टी सुंदरपणे मांडल्या आहेत.

ते उत्तम वक्तेही होते. त्यांच्या भाषणांमुळे लोक हसत आणि विचारही करत. त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले.

पु. ल. देशपांडे हे एक महान साहित्यिक होते. त्यांच्या लेखनातून आपल्याला आनंद, विचार आणि चांगले संस्कार मिळतात.

===================================

5)  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे महान शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. ते खूप मेहनती आणि साधे व्यक्ती होते.

डॉ. कलाम यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मोठे काम केले. त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन” असे म्हणत.

ते भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमी मोठी स्वप्ने पाहायला सांगितली. शिक्षण आणि मेहनत यावर त्यांचा खूप विश्वास होता.

डॉ. कलाम यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देते. ते खरे महान शास्त्रज्ञ आणि आदर्श व्यक्ती होते.

 ===================================