प्लास्टिक मुक्त भारत

 प्लास्टिक मुक्त भारत

प्लास्टिकचा उपयोग आज प्रत्येक ठिकाणी केला जात आहे, भाजीपाला किंवा घराची कोणतीही किराणा वस्तू घ्यायला बाजारात गेल्यावर प्लास्टिक ची पिशवी दिली जाते. प्लास्टिकच्या अतिवापराने निसर्गाला नुकसान सहन करावे लागत आहे. मनुष्याने प्लास्टिकचा शोध लावला आहे, परंतु हा शोध मनुष्यासाठीच हानिकारक सिद्ध होत आहे. प्लास्टिक कधीही सडत नाही. प्लास्टिकला जमिनीमध्ये टाकल्याने झाडांच्या मुळांना ते नुकसान पोहोचवते.
आज भारतच नव्हे तर संपूर्ण जगात प्लास्टिक चर्चेचा विषय बनला आहे. वाढत्या प्रदूषणात प्लास्टिकचे मोठे योगदान आहे. म्हणून जर आजच प्लास्टिक च्या उपयोगाला आळा घातला गेला नाही तर भविष्यात मानवी जीवन मोठ्या संकटात येईल.

आपल्या देशाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. जसे शक्य होईल तेवढा प्लास्टिक बॅग चा उपयोग कमी करा, भाजीपाला किंवा कोणताही किराणा आणण्यासाठी कागदी अथवा कपड्याची बॅग वापरा. आज-काल लग्नसमारंभात जेवणासाठी प्लास्टिकच्या युज अँड थ्रो प्लेट वापरल्या जातात. परंतु या एवजी आपण पारंपरिक मातीचे भांडे किंवा केळीचे पान वापरू शकतात. शक्य होईल तेवढा प्लास्टिकचा उपयोग कमी करा. असे केल्याने प्लास्टिक ची समस्या आपोआप कमी होईल.

भारत शासनाने प्लास्टिक मुक्त भारत या अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोंबर 2019 ला देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये केली.   प्लास्टिक कचरा नद्या व परिसराला प्रदूषित करीत आहे. प्लास्टिक स्वच्छ पाण्याला दूषित करते ज्यामुळे बऱ्याचदा पाण्यात असणारे जीव व मस्यांचा मृत्यू होतो. दूषित पानी प्यायल्याने समाजात रोगराई पसरण्याची शक्यता असते.
प्लास्टिकच्या वाढत्या समस्येपासून वाचण्यासाठी स्वच्छ भारत आणि प्लास्टिक मुक्त भारत यासारखे अभियान यशस्वी करणे आवश्यक आहे. भारत शासनाने प्लास्टिकच्या विरोधात कठोर कायदे बनवायला हवेत. प्लास्टिकचा उपयोग जेवढा टाळता येईल तेवढा टाळायला हवा व अधिकाधिक लोकांना प्लास्टिक चे दुष्परिणाम सांगून जागृत करायला हवे.